शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

टेंभू योजना आज सुरू होणार? सहा कोटींचा टंचाई निधी योजनेकडे वर्ग : कारखानदारांकडून ४ कोटींची पाणीपट्टी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:49 IST

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. आता राज्य शासनाकडून टेंभू योजनेचा ६ कोटी इतका टंचाई निधी जमा झाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून ही रक्कम टेंभू योजनेकडे वर्ग झाली आहे. यामुळे योजना गुरूवारीच सुरू होण्याची शक्यता आहे.

योजनेसाठी केन अ‍ॅग्रो रायगाव कारखान्याकडून २ कोटी, ग्रीन पॉवर गोपूजकडून ७५ लाख, सोनहिरा वांगीकडून ५० लाख व अन्य जमा, असे एकंदरीत ४ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम तातडीने महावितरणकडे भरून वीजपुरवठा पूर्ववत जोडून गुरुवारी टेंभू योजना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

चालूवर्षी टेंभू योजनेचे पहिले आवर्तन मिळण्यास विलंब झाल्याने लाभक्षेत्रातील शेतीपिके कोमेजून चालली आहेत. अशा परिस्थितीत आता टेंभू योजना सुरू होत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेती पिकास जीवदान मिळणार आहे. राज्य शासनाकडे सिंचन योजनांचा टंचाई उपाय योजना निधी अडकला होता. हा निधी मिळविण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर आदी नेत्यांनी पाठपुरावा केला.

आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केन अ‍ॅग्रो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ग्रीन पॉवर या कारखान्यांच्या माध्यमातून टेंभू योजनेची शेतकºयांच्या ऊसबिलातून वसूल झालेली पाणीपट्टी भरली आहे. त्यामुळे आता टंचाई निधी आणि कारखान्यांकडून वसूल झालेली पाणीपट्टी अशी १० कोटींची रक्कम वीजबिल थकबाकीपोटी तात्काळ भरली जाणार आहे आणि टेंभू योजनाही तत्काळ सुरू केली जाणार आहे.तिन्ही योजनांसाठी १४ कोटी वर्गटेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिन्ही योजनांचा एकंदरीत १४ कोटी इतका टंचाई उपाय योजना निधी राज्य शासनाकडून वर्ग झाला आहे. यामध्ये टेंभू योजनेचा ६ कोटी, म्हैसाळ योजनेचा ५ कोटी ५० लाख, तर ताकारी योजनेचा २ कोटी ५० लाख इतका टंचाई उपाय योजना निधी आहे. हा निधी वर्ग झाल्यामुळे योजनांची वीजबिल थकबाकी भरण्यास मदत झाली आहे.आवर्तनासाठी यंत्रणा सज्जयोजना सुरू करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आहेत. वीजपुरवठा पूर्ववत जोडताच टेंभू योजना सुरू होईल. आवर्तनासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आहे. महावितरणकडून सर्वतोपरी सहकार्याची गरज आहे, असे टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली