शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

टेंभू योजना आज सुरू होणार? सहा कोटींचा टंचाई निधी योजनेकडे वर्ग : कारखानदारांकडून ४ कोटींची पाणीपट्टी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:49 IST

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. आता राज्य शासनाकडून टेंभू योजनेचा ६ कोटी इतका टंचाई निधी जमा झाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून ही रक्कम टेंभू योजनेकडे वर्ग झाली आहे. यामुळे योजना गुरूवारीच सुरू होण्याची शक्यता आहे.

योजनेसाठी केन अ‍ॅग्रो रायगाव कारखान्याकडून २ कोटी, ग्रीन पॉवर गोपूजकडून ७५ लाख, सोनहिरा वांगीकडून ५० लाख व अन्य जमा, असे एकंदरीत ४ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम तातडीने महावितरणकडे भरून वीजपुरवठा पूर्ववत जोडून गुरुवारी टेंभू योजना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

चालूवर्षी टेंभू योजनेचे पहिले आवर्तन मिळण्यास विलंब झाल्याने लाभक्षेत्रातील शेतीपिके कोमेजून चालली आहेत. अशा परिस्थितीत आता टेंभू योजना सुरू होत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेती पिकास जीवदान मिळणार आहे. राज्य शासनाकडे सिंचन योजनांचा टंचाई उपाय योजना निधी अडकला होता. हा निधी मिळविण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर आदी नेत्यांनी पाठपुरावा केला.

आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केन अ‍ॅग्रो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ग्रीन पॉवर या कारखान्यांच्या माध्यमातून टेंभू योजनेची शेतकºयांच्या ऊसबिलातून वसूल झालेली पाणीपट्टी भरली आहे. त्यामुळे आता टंचाई निधी आणि कारखान्यांकडून वसूल झालेली पाणीपट्टी अशी १० कोटींची रक्कम वीजबिल थकबाकीपोटी तात्काळ भरली जाणार आहे आणि टेंभू योजनाही तत्काळ सुरू केली जाणार आहे.तिन्ही योजनांसाठी १४ कोटी वर्गटेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिन्ही योजनांचा एकंदरीत १४ कोटी इतका टंचाई उपाय योजना निधी राज्य शासनाकडून वर्ग झाला आहे. यामध्ये टेंभू योजनेचा ६ कोटी, म्हैसाळ योजनेचा ५ कोटी ५० लाख, तर ताकारी योजनेचा २ कोटी ५० लाख इतका टंचाई उपाय योजना निधी आहे. हा निधी वर्ग झाल्यामुळे योजनांची वीजबिल थकबाकी भरण्यास मदत झाली आहे.आवर्तनासाठी यंत्रणा सज्जयोजना सुरू करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आहेत. वीजपुरवठा पूर्ववत जोडताच टेंभू योजना सुरू होईल. आवर्तनासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आहे. महावितरणकडून सर्वतोपरी सहकार्याची गरज आहे, असे टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली